हेल्मेट सक्ती करणारे प्रशासन निकृष्ट रस्ता काम करणाऱ्या कंत्राटदारांना पाठीशी घालत असल्याचा आरोप
बीड (प्रतिनिधी):-बीड जिल्हा अपघातमुक्त करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने दुचाकीस्वारांसाठी हेल्मेट वापर सक्तीचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय निश्चितच स्वागतार्ह असला तरी, अपघातांची प्रमुख कारणे ठरणाऱ्या निकृष्ट व रखडलेल्या राष्ट्रीय महामार्गांच्या कामांकडे प्रशासन जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे, असा गंभीर आरोप सामाजिक कार्यकर्त्यांनी केला आहे. बीड ते अहिल्यानगर, बीड ते परळी, माजलगाव ते तेलगाव, मांजरसुंभा ते लोखंडी सावरगाव…
