संतप्त शेतकऱ्यांनी कृषी अधिकाऱ्यांच्या खुर्चीवर टाकले करपलेले सोयाबीन
(सय्यद अजहर)कळमनुरी तालुक्यात पावसाचा मोठ्या प्रमाणात खंड पडल्यामुळे तालुक्यातील सोयाबीन, कापूस, हळद, तुर, ऊस व इत्यादी पिक पाऊस नसल्यामुळे वाळून जात आहेत. याबाबत निवेदन देण्यासाठी शेतकरी कृषी कार्यालयात आले असता तालुका कृषी अधिकारी व संबंधित इतर कर्मचारी गैरहजर असल्याने संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी त्यांच्या रिकाम्या खुर्चीवर करपलेले सोयाबीन पीक व निवेदन चिपकवले. तालुक्यात जवळपास सर्वच ठिकाणी…